इतिहास
जत तालुक्याला रामायण महाभारत काळापासून संदर्भ आहेत.
1) भीमाने वध केलेल्या बंकासूराचे जतमध्ये प्राचीन मंदिर आहे. बंकेश्वर नावाचे जगातील हे एकमेव मंदीर आहे.
2) काळवेदन राक्षसाचा वध करण्यासाठी श्रीकृष्णाने मुचकंदेश्वर ॠषींच्या आश्रमात आश्रय घेतला होता. ते मुनीवर जत तालुक्यातील मुचंडी येथे वास्तवास होते. त्यांच्या नावावरून गावाचे नाव मुचंडी पडले आहे.
3) महर्षी वाल्मिकी यांनी ध्यान साधना केलेली गुफा कोळगिरी डोंगरात आहे. त्याला जोगीहरी म्हणून ओळखले जाते. वाल्या कोळी यांचे वास्तव्य होते म्हणून गावाचे नाव कोळगिरी पडले आहे.
4) श्री दत्त महाराज यांनी होम केलेल्या कुंडापैकी तिसरा कुंड जत तालुक्यातील तिकुंडी येथे आहे. त्यामुळे गावाचे नाव तिकुंडी पडले आहे.
5) महात्मा बसवेश्वर यांच्या शरण दलाच्या सेनापती, हजार वर्षापूर्वी सामुहिक विवाह पध्दती सुरू करणाऱ्या देवी दानम्मा यांचा जन्म जत तालुक्यात उमराणी येथे झाला. गुड्डापूर हे त्यांचे सासर. सध्या ते लिंगायत धर्माचे तिर्थक्षेत्र आहे.
6) हिंचगीरी सांप्रदायाचे संस्थापक भाऊसाहेब महाराज जत तालुक्यातील उमदीचे.
7) संत गाडगे बाबा महाराज यांचे शिष्य सद्गुरू बागडे बाबा जत तालुक्यातील गोंधळेवाडीचे
8) छत्रपती शिवाजी महाराज यांचे सरसेनापती प्रतापराव गुजर व आदीलशाही सेनापती अब्दुल करिम बहलोल खान यांच्यातील जगप्रसिद्ध युध्द जत तालुक्यातील उमराणी येथे झाले.
9) कर्नाटक व महाराष्ट्र सीमावर्ती भागातील राॅबीनहूड, क्रांतीसूर्य सिंदूर लक्ष्मण जत तालुक्यातील सिंदूरचे .
10) सांगली-सोलापूर-विजापूर अशा तीन जिल्ह्यातील पाच परगण्यात 350 वर्षे राज्य करणारे डफळे संस्थान जतचेच.
11) स्वतंत्र सांगली जिल्ह्याचे पहिले खासदार जतचे श्रीमंत विजयसिंह राजे हे होते.
12) श्रीमंत विजयसिंह राजे हे महाराष्ट्र रणजी संघाचे कर्णधार होते. गोलमेज परिषदेस उपस्थित राहणारे ते जिल्ह्यातील एकमेव होते.
13) जत तालुक्यात 4 भुईकोट किल्ले व एक डोंगरी दूर्ग, तसेच विसहून अधिक गढ्या आहेत.
14) जत तालुक्यात एक हजार वर्षापूर्वीचे पंधराहून अधिक शिलालेख आहेत.
15) जत तालुक्यात दोन हजार वर्षापूर्वीची 17 हेमाडपंथी मंदीरे आहेत.
16) जतच्या यल्लमादेवीची यात्रा जगप्रसिद्ध आहे.
17) माजी राष्ट्रपती बी. डी .जत्ती हे मूळचे जत तालुक्यातील. त्यामुळे त्यांचे आडनाव जत्ती पडले.
18) जत हा गवताळ प्रदेश असून हरिण, तरस, लांडगे, खवले मांजर, वोंबाट, दुर्मिळ घुबड, म्हांडूळ, घोणस, नागसाप, अजगर असे अनेक दुर्मिळ वन्यजीव जत तालुक्यात आजही आढळून येतात.
माडग्याळी मेंढी, बोरे, व्हसपेठचे जेन, वाळेखिंडी, सिंदूर पेढे, हळद, डाळींब ही जतची खासियत आहे.
जत तालुक्यातील काराजनगी या गावात अद्यापही दूध विकले जात नाही.
जत तालुक्यातील वळसंग या गावी दोनमजली इमारत नाही त्याच प्रमाणे येथील लोक गादी वापरत नाहीत व लग्नात ही गादीऐवजी जेन किंवा सतरंजी देतात.
जत तालुक्यातील बनाळी हे गांव संपूर्णपणे शाकाहारी गाव म्हणून ओळखले जाते.या ठिकाणी मांसाहार करून गेल्यास मधमाशां त्यांचा पाठलाग करत चावा घेतात अशी माहीती आहे.
तालुक्यातील संख व उमदी या गावात सोयरिक होत नाही त्याच प्रमाणे दोन्ही गावातील लोक संखचे लोक उमदी गावातील व उमदीचे लोक संख गावातील पाणी पित नाहीत.ते या गावात प्रवेश करताना आपल्या बरोबर.पाणी सोबत घेऊन जातात.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर
यांना 5 मार्च 1934 रोजी जतचे संस्थानिक श्रीमंत विजयसिंहराजे डफळे यांनी जत नगरित आमंत्रित करून त्यांची जत नगरितून शाही मिरवणूक काढली होती.यावेळी अस्पृष्य परिषद ही घेण्यात आली होती.